Vihir Anudan Yojana : जुन्या आणि नवीन विहिरी साठी शासनाकडून मिळतंय अनुदान अर्ज असा करा

vihir anudan yojana subsidy : राज्याच्या आर्थिक विकासासाठी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश ठेवून महाराष्ट्र शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तसेच आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती.

योजनेची सुरुवात आणि उद्दिष्टे

जानेवारी २०२४ मध्ये सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तांत्रिक प्रशिक्षण तसेच जल व्यवस्थापनाचे साधन उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते.

हेही वाचा :  आली बातमी पी एम किसान चा 15 वा हप्ता हा दिवाळीलाच 15 नोव्हेंबर ला खात्यावर Pm Kisan 15 Installement Date

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास सहाय्य होईल या साठी मदत गार ठरते. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून शेतीच्या माध्यमातून त्यांचा जीवनस्तर उंचावणे. vihir anudan yojana subsidy

कशासाठी किती अनुदान ?

या योजनेअंतर्गत खालील प्रकारचे अनुदान उपलब्ध आहे खाली

  1. नवीन विहिरीसाठी : प्रत्येक लाभार्थ्यासाठी ₹२.५ लाख पर्यंत अनुदान मिळते .
  2. जुनी विहीर दुरुस्तीसाठी : जास्तीत जास्त ₹५०,००० अनुदान मिळते.
हेही वाचा :  तुमच्यां ग्रामपंचायती मध्ये कोणत्या योजना चालू आहेत आणि कोणाचे चालू आहेत या ठिकाणी पहाnew scheme for grampanchayat | विहीर लाभार्थी यादी पहा मोबाईल वर | Vihir Labharthi Yadi Grampanchayat

कोणाला लाभ मिळतो ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू होतात

  • लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे तसेच
  • शेतजमीन मालकी असलेले शेतकरी प्राधान्याने पात्र ठरतात.

अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन उपलब्ध आहे ती खालील प्रमाणे

  • महाडीबीटी पोर्टल  (https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login) वर जाऊन नोंदणी व अर्ज सादर करता येतो.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. vihir anudan yojana subsidy

महत्त्व आणि फायदे

  • विहिरीसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सोडवणे शक्य होईल तसेच
  • शेतकऱ्यांना नवीन पिके घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि
  • आर्थिक पाठबळामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात अधिक गुंतवणूक करता येईल.
हेही वाचा :  आता 5 जी सुरुवात अहमदनगर मध्ये !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना केवळ आर्थिक साहाय्यापुरती मर्यादित नाही तर शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Question And Answer

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कधी सुरू झाली ?

उत्तर : जानेवारी २०२४ मध्ये , ही योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली.

2. ही योजना कोणासाठी लागू आहे ?

उत्तर : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी, या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे योजनेचा मुख्य उद्देश आहे.

3. नवीन विहिरीसाठी किती अनुदान मिळते ?

उत्तर : ₹२.५ लाख, शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुधारण्यासाठी हे अनुदान दिले जाते.

4. जुनी विहीर दुरुस्तीसाठी किती अनुदान आहे ?

उत्तर : ₹५०,०००, विहिरींच्या देखभालीसाठी आर्थिक मदतीचा समावेश केला आहे.

5. योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?

उत्तर : शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे, शेतीतील उत्पन्नवाढीसाठी मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे.

6. अर्ज प्रक्रिया कशी आहे ?

उत्तर : महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो, शेतकऱ्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या सुलभ पर्याय उपलब्ध आहे.

7. अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क साधावा ?

उत्तर : जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागाशी, अधिकृत माहिती व मदत येथे उपलब्ध आहे.

8. योजनेचा संबंध कोणत्या प्रवर्गाशी आहे ?

उत्तर : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांशी, या प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जातो.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment